महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र मुख्य बातम्या

ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा

सोलापूर/अशोक कांबळे – स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे.मागासवर्गीय अधिकारी,कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यात यावे.ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास महाराष्ट्र शासन आणि ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे असा आरोप ज्योती क्रांती परिषदेने केला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे यासाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश बारस्कार यांच्या नेतृत्वाखाली झाला.

यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्वीकारले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आहे आहे. 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास किसन गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार ( रिट याचिका क्र.980/2019) या खटल्याच्या निकालानुसार अकोला,वाशीम, गोंदिया, नागपूर, धुळे, व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या मधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरवले.याबाबतची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दि.28 मे 2021 रोजी फेटाळली आहे.

राज्य सरकारने त्यापूर्वीच याची दखल घेतली असती आणि के.कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार 2010 या खटल्याच्या निकालानुसार त्रिसूत्रीची पूर्तता केली असती तर सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले नसते.ओबीसींकरीता अतिशय महत्वाचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाने अक्षम्य दिरंगाई केली याला महाराष्ट्र शासन आणि विशेषतः ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून याचा तीव्र निषेध करतो.

ज्योती क्रांती परिषदेच्या मोर्च्यात या होत्या मागण्या

ज्या ज्या वेळी ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा पुढे येतो त्या त्या वेळी ओबीसींच्या निश्चित लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते.विधानसभेने एकमताने पारित केलेल्या जातनिहाय जनगणनेबाबतच्या ठरावानुसार केंद्र सरकार जनगणना करीत नसेल तर राज्य शासनाने राज्याची जातनिहाय जनगणना करावी.

उच्च न्यायालयाने याचिका क्र.2797/2015 प्रकरणी दि.4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवले असले तरी या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिली नसल्याने पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीयांची 33 टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत.महाराष्ट्र शासनाने दि.7 मे 2021 रोजीचा तडकाफडकी काढण्यात आलेला शासन निर्णय हा संविधानविरोधी असल्याने तो पूर्णतः विनाविलंब रद्द करण्यात यावा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती,जमाती,निरधिसूचित जमाती विमुक्त भटक्या) भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2021 या महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण अधिनियमामध्ये पदोन्नती मधील आरक्षण देण्याची तरतूद आहे.त्यानुसार ओबीसींना ही पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे.

शासकीय सेवामधील ओबीसींचा अनुशेष विनाविलंब भरण्यात यावा.बहुप्रतिक्षित असलेली राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी.तत्पूर्वी दि.22 ऑगस्ट 2019 रोजी बिंदूनामावलीला दिलेली स्थगिती उठवावी.

आदिवासीबहुल 8 जिल्ह्यातील वर्ग 3 व 4 मधील पदासाठीचे ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे.ते पूर्ववत करण्यासाठी दि.12 जून 2020 रोजी मंत्रीगटाची उपसमिती नेमण्यात आली होती.परंतु अजूनही उपसमितीच्या शिफारशी गुलदस्त्यातच आहेत.तरी 8 जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. अशा माँगण्या करण्यात आल्या आहेत.मागण्या मान्य नाही झाल्यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील आगामी निवडणुका घेण्यास विरोध करण्याबरोबरच इतर मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल.या मोर्चात नगरसेवक अतुल क्षीरसागर, ता.अध्यक्ष सोमनाथ माळी, महिला ता.अध्यक्ष संगीता पवार,अनंत नागेनकेरी यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील विविध समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »