महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

मान्सूनला थोडेच दिवस शिल्लक असल्याने कापूस लागवडीला आला वेग

जळगाव/प्रतिनिधी – मान्सून काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांनी शेताची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कापसाची लागवड सुरू झाली आहे. गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती. मात्र यावेळी शासनाने एक जून नंतर पुरेसा पाऊस पडल्यानंतरच कापसाची लागवड करावी असे शेतकाऱ्यांना आवाहन केले होते. त्यामुळेच आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करताना शेतकरी दिसत आहे.

कापूस (Cotton) लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. बियाणे, खत, फवारणी यांच्या वाढलेल्या किमती, मजुरांची वाढलेली रोजंदारी यामुळे शेतकऱ्यांला जास्त खर्च करावा लागतो. तरी देखील कापसाला भाव मिळत नाही. अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी जानकीराम पाटील यांनी दिली आहे. नाईलाजाने शेतकऱ्यांना कापूस लागवड करावी लागते उन्हामुळे व रब्बीचा हंगाम संपल्याने शेतात शुकशुकाट दिसत होता. आता शेतामध्ये कापूस लागवड सुरू असल्यामुळे धावपळीचे चित्र आहे.

 

Related Posts
Translate »