जळगाव/प्रतिनिधी – मान्सून काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने शेतकऱ्यांनी शेताची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कापसाची लागवड सुरू झाली आहे. गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती. मात्र यावेळी शासनाने एक जून नंतर पुरेसा पाऊस पडल्यानंतरच कापसाची लागवड करावी असे शेतकाऱ्यांना आवाहन केले होते. त्यामुळेच आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करताना शेतकरी दिसत आहे.
कापूस (Cotton) लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. बियाणे, खत, फवारणी यांच्या वाढलेल्या किमती, मजुरांची वाढलेली रोजंदारी यामुळे शेतकऱ्यांला जास्त खर्च करावा लागतो. तरी देखील कापसाला भाव मिळत नाही. अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी जानकीराम पाटील यांनी दिली आहे. नाईलाजाने शेतकऱ्यांना कापूस लागवड करावी लागते उन्हामुळे व रब्बीचा हंगाम संपल्याने शेतात शुकशुकाट दिसत होता. आता शेतामध्ये कापूस लागवड सुरू असल्यामुळे धावपळीचे चित्र आहे.