महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

मोहन उगले महिला विनयभंग प्रकरण, सत्य समोर आले पाहिजे- आमदारांची मागणी

DESK MARATHI NEWS.
कल्याण/ प्रतिनिधी –  कल्याण पश्चिमेतील स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांवर रागाचा पारा वाढला आहे पोलिसांनी शहानिशा आणि चौकशी करून गुन्हे दाखल करावेत त्यात संबंधितांची नाहक बदनामी होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कल्याण पश्चिमेतील ठाणकर भागात राहणारी ४१ वर्षीय महिलेला छळवणूक आणि विनयभंग केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक मोहन उगले याच्यावर  विविध कलमान्वये महिलेचा छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहन उगले वारंवार पीडित महिलेला वाईट नजरेने पाहून तिचा  मानसिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे 
पीडित महिलेने कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान या प्रकरणावर बोलताना आ.विश्वनाथ भोईर यांनी संताप व्यक्त करीत पोलिसांनी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करताना शहानिशा आणि चौकशी करावी मग गुन्हा दाखल करावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे उपशहर अध्यक्ष व माजी नगरसेवक मोहन उगले  यावेळी बोलताना म्हणाले की ठाणकरपाडा प्रभागात काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जिंकण्याची शक्यता कमी असल्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मला  गोवण्यात येत आहे येथे शिवसेनेच प्राबल्य असल्याने कोणाचेही डाळ शिजणार नाही त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होण्याची शृंखला अधिकच वाढणार आहे पोलिस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की शहानिशा करून गुन्हे दाखल करावे. 
पण या सर्व प्रकरणाकडे पाहता जर हा गुन्हा खरा आहे तर एक लोकप्रतिनिधीवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे गंभीर बाब आहेच पण  तेवढीच लज्जास्पद बाब आहे. आणि जर हा गुन्हा खोटा आहे तर मग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे का? असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. पोलिस तपासात सत्य हे बाहेर येईलच आणि खरा गुन्हेगार आणि त्यामागील सत्य बाहेर येईल अशी अशा आहे. 
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »