महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी .

पुणे – देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम असून नेमके काय करायला पाहिजे जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, हेच कळत नसल्याने केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत येणार्‍या अफवांना बळी पडू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
जागतिक संघटनेने भारताला पूर्णपणे कंगाल म्हणून घोषित केले आहे. तशीच परिस्थिती चीनची झाली आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता यांच्या नाकी नऊ आले आहे. चीन आणि भारत या दोघांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कोरोना पसरविला म्हणून चीनवर जगभरातून आरोप केला जात आहे. तर भारतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान मोदी यांना कळत नाही म्हणून देशातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दोघांनाही त्यांच्या देशातील लोकांना फसवायचे आहे आणि म्हणून जशी गावांमध्ये लुटुपुटूची लढाई होते तशाच पद्धतीने चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची लुटूपुटूची लढाई सीमेवर सुरु झाली आहे. कधी लडाख तर कधी आसाम तर कधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश मध्ये ही लढाई दिसून येते. दोन्ही देशांची परिस्थिती अजून ही युद्धा सारखी झालेली नाही, किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप आणि आर.एस.एस यांनी जो खेळ चालवलाय की चीनकडून आपल्याला धोका आहे. तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका. मात्र चीनकडुन भारताला धोका निश्चित आहे. पण ते वेगळ्या कारणांमुळे, दोन्ही देश ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे त्रस्त झाले असून आर्थिक स्थिती कशी सुधारावी हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे दोन्ही देश त्रस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Related Posts
Translate »