महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुख्य बातम्या मुंबई

मनसेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय,राजन साळवींचा हल्लाबोल

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कालही काही असेच झाले दरवर्षी प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा थाटामाटात पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंना ऐकण्यासाठी लाखो मनसैनिक जमले होते. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. त्या नंतर राज ठाकरेंवर आता विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राज ठाकरेंवर कड्या शब्दात टीका केली ते म्हणाले “शिवसेनेतून फारकत घेतल्यापासून राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला. गेल्या काही वर्षांमधली मनसेची महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर ती चांगली नाही. मनसेची भूमिका नेहमी बदलत चाललेली आहे. त्यांचे 13 आमदार होते दुर्दैवाने आज त्यांच्याकडे फक्त एकच आमदार शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जो महायुतीला पाठिंबा दिलेला आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची लोकप्रियता घटत चाललेली आहे. अशा परिस्थितीत बीजेपीला पाठींबा देऊन मनसेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. येत्या काळात महायुती यशस्वी होणार नाही याचा मला विश्वास आहे.”

त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा राज ठाकरेंवर ट्विट च्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्यामुळे आता विरोधी पक्षाबरोबरच राजठाकरेंवर विश्वास ठेवणाऱ्या लाखों मनसैनिकांना हाच प्रश्न पडला आहे की आता पुढे राज ठाकरे कोणती खेळी खेळतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीजेपीला पाठींबा दिल्यामुळे अनेक लोकांच्या नाराजीला राज ठाकरेंना सामोरे जावे लागणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »