महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

भिवंडी ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

ठाणे/संघर्ष गांगुर्डे – स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील 34 गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाहणी करून उपाय योजना करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील 34 गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, ठाणे महानगरपालिकेचे सहआयुक्त संदीप माळवी, स्टेम प्रकल्पाचे महाव्यवस्थापक संकेत घरत यांच्यासह 34 गावांचे सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्टेम पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून त्याचा विस्तार झाला नाही. आजही भिवंडी तालुक्यातील 34गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच या योजनेद्वारे 34 गावांसाठी 41 एमएलडी पाणी आरक्षित असताना केवळ 11 एमएलडी पाणी देण्यात येते. हे पाणीही नियमित नसल्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना अडचणी निर्माण होतात. काही गावांना पाणीच पोचत नाही तर काही गावांना अपुरा पाणी पुरवठा होतो. या गावांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी स्टेम प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांनी येत्या आठ दिवसात पाहणी करून उपाययोजना करावेत.

स्टेम प्रकल्पातील 34 गावांना अपुरा पाणी पुरवठा होत असतानाही पाणी देयके मात्र मोठ्या प्रमाणात येतात. तसेच थकीत देयकांवर व्याज लावले गेले आहे. हे व्याज माफ करण्यासंदर्भात विचार करण्यात यावा. गावापर्यंत पाणी आल्यानंतर अंतर्गत वितरणाची व्यवस्था ठाणे जिल्हा परिषदेने करावी. तसेच जलजीवन मिशनमधून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देता येईल का याचाही विचार करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्टेम कंपनीचे महाव्यवस्थापक श्री. घरत यांनी या गावांमध्ये प्रत्यक्ष पाणी करून पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी विविध गावांच्या सरपंच व लोकप्रतिनिधींनी पाणी मिळण्यासंदर्भातील अडचणी मांडल्या.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »