महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पर्यटन

नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकण वासियांचा प्रवास सुखकर करा -आमदार राजू पाटील

कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी -गौरी गणपती निमित्त मुंबई सह उप नगरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या हि लक्षणीय असते. परंतु कोकण वासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. यंदा देखील एकाही रेल्वे गाडीत गाडीत वासियांना तिकीट उपलब्ध होत नसल्याने कोकण वासियांची निराशा झाली आहे. त्यामुळे कोकण वासियांसाठी विशेष आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची तिकीट फुल्ल झाली आहेत. त्यामुळे सध्या कोकण वासीयांसमोर गावी जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण वासियांच्या व्यथा मानस आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मांडल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे गौरी गणपती दरम्यान सर्व गाड्या फुल्ल झाल्या असून एकही गाडीमधील प्रतीक्षा यादीत उपलब्ध तिकीट दिसून येत नाही. कोकणात गणपती उत्सवा निमित्त जाणारे बांधव तिकीट मिळावं म्हणून रात्रभर रांगेत उभे असतात. परंतु तिकीट नाही कारण रेल्वे आरक्षण पूर्णपणे दलालांच्या ताब्यात गेलं आहे.

दरवर्षी रेल्वे कडून दलालांवर कारवाईचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने दलालांनी सर्व रेल्वे आरक्षणावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे गौरी गणपती निमित्त आत्ताच नवीन विशेष गाड्यांचे नियोजन करावं असं आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर,दिवा,पनवेल,मुंबई सेंट्रल,वसई येथून सर्वाधिक आरक्षित आणि अनारक्षित गाडया सोडून कोकण वासियांना दिलासा देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.त्यामुळे आमदार राजू पाटील यांच्या पत्रानंतर आता रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्व कोकण वासियांच्या नजरा लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

Related Posts
Translate »