हरियाणा प्रतिनिधी – बाबा गुरबचनसिंह मेमोरियल २१ व्या क्रिकेट टुर्नामेंटचा शुभारंभ, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा मैदान येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यामध्ये मुंबई-महाराष्ट्रातील दोन टीमचा समावेश आहे.
यावर्षी या क्रिकेट टुर्नामेंटचा मुख्य विषय ‘स्थिर मन, सहज जीवन’ असा असून ही क्रिकेट टुर्नामेंट २ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या प्रतियोगितेमध्ये देशाच्या अनेक राज्यांतून, जसे- दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश इत्यादि राज्यांतून आलेल्या युवकांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४८ टीमची निवड करण्यात आली आहे. या क्रिकेट टूर्नामेंटबद्दल त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात आली आहे. याशिवाय कोविड-१९ च्या संदर्भात सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे या टूर्नामेंटमध्ये पालन केले जात आहे. या क्रिकेट टुर्नामेंटची सुरवात बाबा हरदेवसिंहजी यांनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केली होती. बाबा गुरबचनसिंहजी यांनी तरुणांच्या उर्जेला नवा आयाम देण्यासाठी त्यांना सदैव खेळांच्या प्रति प्रेरित केले आणि त्यांच्या उर्जेला उपयुक्त दिशा दिली ज्यायोगे देश व समाजाची सुंदर निर्मिती व समुचित विकास केला जाऊ शकेल.
समालखा येथे आयोजित केलेल्या या क्रिकेट टुर्नामेंटच्या शुभारंभ प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी, मंडळाच्या केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य आणि कार्यकारिणी समितीचे सदस्य सहभागी झाले होते. संत निरंकारी मंडळाचे प्रधान आदरणीय भाईया गोबिंदसिंह यांनी ध्वजारोहण करुन या टूर्नामेंटचे उद्घाटन केले. या प्रसंगी आदरणीय सुखदेवसिंह, चेअरमन, केन्द्रीय योजना व सलाहकार बोर्ड यांनी शांतीचे प्रतीक स्वरुप फुगे आकाशात सोडले.
वर्तमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज नवऊर्जेसह वेळोवेळी विविध खेळांचे आयोजन करुन युवावर्गाला प्रोत्साहित करत आहेत. त्यामध्ये निरंकारी यूथ सिंपोझियम आणि निरंकारी सेवादल सिंपोझियम यांसारख्या उपक्रमांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. याद्वारे त्या सदोदित शारीरिक व्यायाम आणि खेळांच्या प्रति प्रोत्साहित करत आल्या आहेत.