महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी लोकप्रिय बातम्या

उष्णतेमुळे खराब होतोय कांदा, शेतकरी राजाचा झालाय वांदा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – श्रीमंत असो किवा गरीब कांदा हा दैनंदिन जीवनातील प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा घटक. त्यामुळेच कांदा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतोच. कांदा महागला तरी चर्चेत, कांदा स्वस्त झाला तरी चर्चेत, कांद्यावर निर्यात बंदी लावली तरी चर्चेत, निर्यात बंदी उठवली तरी चर्चेत. कांद्याच्या चर्चा या होताच राहतात पण कांदा पिकविण्यासाठी रक्ताच पाणी करणारा शेतकरी मात्र कधी चर्चेत नसतोच तो असतो नेहमीच अडचणीत. आणि उष्णतेमुळे कांदा खराब होऊ लागल्याने आता कांदा चर्चेत आला आहे, आणि शेतकरी अडचणीत.

कांद्याला भाव मिळेल या आशेने येवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी एक एकर क्षेत्रामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले मात्र ज्यावेळी कांदा विक्रीस आला त्यावेळेस कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्षामुळे बाजार समिती बंद होत्या. गेल्या महिन्याभर बाजार समिती बंद ,त्यात उन्हाचा तडाका यामुळे साठवलेला कांदा हा खराब झाला असल्याने आता केलेला खर्च देखील निघणे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मुश्किल झाले आहे. तरी कांदा व्यापारी व माथाडी कामगार संघर्ष व वाढती उष्णता यामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब असल्याने परत एकदा बळीराजा संकटात सापडलाय.

आणि आता या संकटाची चर्चा करून मायबाप सरकारने चर्चा न करता शेतकऱ्याची अडचण कशी दूर करता येईल या कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशी आशा शेतकरी करत आहे.

Related Posts
Translate »