महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पर्यावरण

कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण ते टिटवाळा हा महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पामुळे इथली वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याबरोबरच या रस्त्याची, पर्यावरण संवर्धनाचे नवे केंद्र अशी ओळख ठरणार आहे.  या रिंगरोडच्या दुतर्फा पहिल्या टप्प्यात तब्बल बाराशेहून वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.आजच्या जागतिक वसुंधरा दिनाचे  औचित्य साधून दुर्गाडी चौक ते गांधारीपर्यंत साडेचारशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवाईने नटलेला पहायला मिळणार आहे. 

महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कमी होणार असून वेगवेगळ्या टप्प्यात बनत असलेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी  बाधित झालेल्या वृक्षसंपदेच्या बदल्यात आंबिवली येथील टेकडीवर महापालिकेमार्फत हिरवेगार निसर्ग उद्यान बनवण्यात आले आहे.   निसर्गाशी अनुरूप होण्यासह त्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख देण्याच्या दृष्टीने रिंगरोडच्या कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुतर्फा वृक्ष लावण्यात येत असल्याची माहिती  महापालिकेचे  सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक  संजय जाधव यांनी दिली. 

या रिंगरोडवर लावण्यात येणाऱ्या वृक्षांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार असल्याची माहितीही महापालिकेचे सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. यामध्ये   ताम्हाण, कदंब, जांभूळ, मोहगणी, बकुळ अशी वेगवेगळ्या प्रजातीची वृक्ष संपदा बहरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वृक्ष लागवड संकल्पनेसाठी विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत, त्यापैकी देव इंजिनिअरिंग या कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरणाशी समतोल साधणारी  बाराशे झाडं लावण्यात येणार आहेत. तसेच पुढील वर्षभर याच संस्थेमार्फत या झाडांची देखभाल आणि निगा राखली जाणार आहे.या समयी महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, देव इंजिनिअरिंगचे राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »