कल्याण/प्रतिनिधी – १८ जूनला सकाळी मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्सप्रेमधून प्रवास करणारे सगीर अहमद यांचा मोबाईल अचानक चोरीस गेला. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल चोरीस गेला तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. ट्रेन सुरुच होती. ही गोष्ट त्यांनी गाडीतील सहप्रवाशांना सांगितली. प्रवाशांनी बोगीतच झाडाझडती सुरु केली. यावेळी एक संशयित तरुण प्रवाशांच्या हाती लागला. सगीर अहमद यांच्यासह अन्य प्रवाशांनी या संशयीत तरुणाला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. हसन शेख उर्फ अरबाज शेख असे या तरुणाचे नाव होते. या तरुणाला ताब्यात घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरु केली. अखेर सगीर अहमद यांचा चोरीस गेलेला मोबाईल हसन उर्फ अरबाजने चोरल्याचे समोर आले.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी व त्यांच्या सहकार्यांनी या चोराची कसून चोकशी केली आसता अरबाज याने त्याच्या आणखीन एक साथीदाराचे नाव सागितले.हे दोघे मिळून हे एक्सप्रेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरत अआस्ल्याचे समोर आले आहे.आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य चोरट्याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव तसलीम शेख असे आहे. हे दोघेही मुंब्रा येथेच राहतात. धक्कादाय म्हणजे या दोघांनी मिळून एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तब्बल 11 मोबाईल लंपास केले होते. आतापर्यंत फक्त चार प्रवाशांची नावे समोर आली आहेत, ज्यांचे मोबाईल चोरीस गेले होते. अन्य मोबाईल कोणाचे आहेत त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चोरट्यांकडून एक्सप्रेसमध्ये चोरीचे 11 मोबाईल पोलिसांनी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पोलिस ज्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे त्यांचा शोध घेत आहेत जेणेकरुन त्यांना मोबाईल देता येईल.