महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

पुण्यात“कलम आणि कवच संरक्षण साहित्य महोत्सव संपन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पुणे/प्रतिनिधी – पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या  दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड  इन्स्टिटयूट येथे “कलम आणि कवच” या संरक्षणविषयक  साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीबीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले.

भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विकसित होत असलेल्या परिदृश्यावर काम करण्यासाठी आपले प्राचीन ग्रंथ ‘’महाभारत आणि  भगवद गीता’’ यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे.  जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात धर्माच्या शाश्वत प्रासंगिकतेला प्रोत्साहन देत कर्तव्य, धर्म आणि नैतिक संतुलन साधण्याच्या सिद्धांतावर भर दिला. या प्राचीन रणनीतींना आधुनिक काळातील धोके आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी अनुकूल बनवण्याच्या गरजेवर दक्षिण कमांडचे प्रमुख  लेफ्टनंट  जनरल ए  के सिंह यांनी भर दिला.

या महोत्सवात चार महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. यामध्ये जागतिक भू-राजनीती पासून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्त्वपूर्ण भूमिका यावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे. या चार पुस्तकांमध्ये अजय सिंह लिखित “रूस, गाजा, ताइवान… ए वर्ल्ड एट वॉर” तसंच कर्नल अमित सिन्हा आणि विजय खरे लिखित “ए आय एंड नेशनल सिक्योरिटी” या पुस्तकांचाही समावेश आहे.

कारगिल युद्धाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना पेंटागॉन प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन आर्य यांनी राष्ट्रीय सुरक्षेतील जागरूकता वाढवण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात आयोजित ‘आत्मनिर्भर भारत – भारतीय संरक्षण क्षेत्राला सशक्त बनवणे’ या विशेष सत्रात बाबा कल्याणी यांच्यासारखे प्रमुख उद्योग नेते सहभागी झाले होते.

पुण्यात आयोजित हा महत्त्वपूर्ण महोत्सव, या विषयातील सर्व तज्ञांना एका व्यासपीठावर आणण्यात सफल ठरला. या महोत्सवात तज्ञांनी जगभरात घडत असलेल्या संघर्षाबाबत तसेच देशाच्या  संरक्षण lविषयक भूमिकेपर्यंतच्या विविध मुद्द्यावर  चर्चा केली. हा महोत्सव भविष्यातील आयोजनासाठी एक विषय सूची ठरू शकतो. इतिहास, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा या मुद्द्यांना एका सामंजस्यपूर्ण कथेमध्ये सामील करणे हा या उत्सवाचा महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »