नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो असे पैठण मधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.
पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली असा संवाद लोकांशी त्यांनी भाषणातून साधला.
फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही असेही ते आपल्या भाषणात म्हणाले
टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो चांगले काम आपल्याला करायचे आहे. एवढेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी मला शिकवले. सर्व आपली माणसे सभेत आहेत. ते आपल्या प्रेमापोटी येतात. काही सभा मी पाहिल्या. राष्ट्रवादीचे लोक काही सभेत पाठवले जातात. आमची गर्दी तशी नाही. असा टोलाही मुख्यमंत्री यांनी विरोधकांना लगावला.
विकास कामावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि पाणीपुरवठ्याला निधी कमी पडू देणार नाही. या भागाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. वैजापूर-गंगापूर मतदारसंघात मराठवाडा वाॅटरग्रीडसाठी मंजूर झाले आहेत. हे सरकार काम करणारे सरकार आहे. दोन महिन्यात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आम्ही घेत्तले आहे घेतले
एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे अशी टीका झाली, पण याच साबनाने ठाकरे गटाची मस्त धुलाई केली. बाळासाहेबांना कुणी धोका दिला हे तुम्हीच ठरवा. याकूब मेमन देशद्रोही होता त्याच्या कब्रस्थानाचे उद्दात्तीकरण मविआने केले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा कलम 370 सोबत चांगले निर्णय घेतले त्यांचे सहकारी व्हायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला.
मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार हरिभाऊ बागडे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ या वेळी उपस्थित होते.