नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
चंद्रपूर/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. 30 टक्के वेतनवाढ, समान काम समान वेतन NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा प्रदान करा, अशा प्रमुख मागण्यांसाठी . महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे, कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगारांना न्याय मिळाला नाही. सरकारनी त्याची दखल घेतली नाही त्यामुळे 28 कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची स्थापना केली.
समितीतर्फे सर्व वीज कंत्राटी कामगारांना 30 टक्के वेतनवाढ, NMR च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम, समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी 9 फेब्रुवारीपासून टप्प्यात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. 5 मार्च ला मध्यरात्री पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज पासून चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलनाला सुरुवात केली. जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.