महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान – २०२२ चे उद्घाटन

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्ली – कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथील एनएएससी  कॉम्प्लेक्स येथे 2022-23 च्या खरीप अभियानासाठी  राष्ट्रीय कृषी संमेलनाचे उद्घाटन केले. त्यांनी समाधान व्यक्त केले की दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार (2021-22) देशात एकूण 3160 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो एक सार्वकालीन विक्रम असेल.

डाळी आणि तेलबियांचे उत्पादन अनुक्रमे 269.5 आणि 371.5 लाख टन असेल. तिसऱ्या आगाऊ  अंदाजानुसार, 2020-21 मध्ये फलोत्पादन 3310.5 लाख टन आहे , जे आतापर्यंतचे सर्वाधिक  फलोत्पादन आहे.   शेतकऱ्यांचा  खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशके आणि बियाणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्र काम करतील असे ते म्हणाले. . युरियाच्या जागी नॅनो-युरिया वापरण्याची  रणनीती अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकार नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीवर यापुढेही भर देत राहील, असे त्यांनी जाहीर केले. निर्यातीबाबत ते म्हणाले की, कृषी निर्यातीत वाढ होत असताना अन्य दर्जेदार उत्पादनांकडेही लक्ष दिले पाहिजे , जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. निर्यातदार आणि शेतकरी या दोघांचाही फायदा झाला पाहिजे.

मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा  आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून खरीप हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्ट निश्चित करणे, महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि उत्पादन आणि पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा या परिषदेचा उद्देश होता. सरकार तेलबिया आणि कडधान्यांमध्ये स्वयंपूर्णता आणि पामतेल उत्पादन यांना प्रोत्साहन देण्याकडे  लक्ष केंद्रित करून पीक विविधीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. देशात वैविध्यपूर्ण पिके घेण्यासंबंधी कार्यक्रमासाठी राष्ट्रीय धोरण आराखडा अंतिम  करण्यासाठी प्रमुख राज्ये, संशोधक, उद्योग आणि धोरणकर्ते  यासारख्या सर्व हितधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. शेती शाश्वत, फायदेशीर आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व राज्यांनी वैविध्यपूर्ण पिके घेण्यासाठी काम केले पाहिजे.

या संमेलनात चालू वर्षात 3160 लाख टन अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत 2022-23 या वर्षासाठी एकूण 3280 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »