महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५३ उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते.अन्न,वस्त्र,निवारा याप्रमाणेच लोकसभा निवडणूक ही फार महत्वाची आहे. कारण निवडनुकीच्या या प्रक्रियेमुळेच समाज सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडत असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य जनतेला आपला आवडता उमेदवार निवडून देण्याचा अधिकार असतो. सर्वसामान्यांची मदत करणारा त्यांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणाऱ्या उमेदवारला निवडून देणे हे मोठे दाइत्वच आहे, आणि याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असायलाच हवी.

आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील आठ मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पिढीलप्रमाणे आहे यात बुलढाणा 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ-वाशिम 20, हिंगोली 48, नांदेड 66, आणि परभणी 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात बुलढाणा ,अकोला, अमरावती, वर्धा , यवतमाळ-वाशिम, हिंगोली ,नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत एकूण 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल झाले होते. पण एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Related Posts
Translate »