महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा लोकप्रिय बातम्या

खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मल्लखांबने क्रीडारसिकांचे वेधले लक्ष

नेशन न्यूज मराठी टीम.

बंगळुरू – चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडशी असलेले नाते आणि त्यासोबत येणारे ग्लॅमर यामुळे मुंबईचे वर्णन अनेकदा स्वप्ननगरी म्हणून केले जाते. खेळाच्या बाबतीत, क्रिकेट म्हणजे प्रत्येक मुंबईकराचा श्वास असतो. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांमुळेही हे शहर क्रिकेटशी कायम जोडले गेले आहे.

मात्र, बेंगळुरू इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2021 मध्ये, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मल्लखांब खेळाडूंनी पुरुष आणि महिला दोन्ही गटात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकून या क्रीडाप्रकारात देखील आपला झेंडा रोवला आहे.

आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मुंबई विद्यापीठाने एकूण 86.45 गुणांसह महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, तर पुणे विद्यापीठाच्या संघाने 82.95 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. कांस्यपदक उज्जैनच्या विक्रम विद्यापीठ संघाला मिळाले.

इतकेच नाही, तर पुरुष गटातही मुंबई विद्यापीठाने सांघिक विजेतेपद पटकावत सुवर्ण, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं रौप्यपदक मिळवले. झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठाने कांस्यपदक जिंकले.

मुंबई विद्यापीठाचा अजिंक्य मल्लखांबपटू दीपक शिंदे याने याधीही, मुलांच्या ऑल राऊंड (अष्टपैलू) वैयक्तिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेत भाग घेतला होता आणि पोलमध्ये 9.6, रोपमध्ये 8.7 आणि हँगिंगमध्ये 9 गुणांसह एकूण 27.30 गुण मिळवले आणि या स्पर्धेत तो अव्वल खेळाडू ठरला आहे.

एम कॉम ला शिकत असलेल्या या 25 वर्षीय खेळाडूने आपल्या नेत्रदीपक कामगिरीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले, “खेलो इंडिया, हा मल्लखांब खेळाडूंसाठी सर्वात मोठा क्रीडा मंच ठरला आहे. तसेच स्पर्धा गटात मल्लखांबचा समावेश केल्याबद्दल त्याने, सरकारचे आभार मानले.”  एका सर्वसामान्य कुटुंबातला युवक असलेल्या दीपकने खेळात करियर करण्याची प्रेरणा आपल्या भावाकडून घेतली. आता हे दोन्ही भाऊ, एक क्रीडा प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्र चालवतात. तिथे ते उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देतात. सरकारच्या पाठिंब्यामुळे, मल्लखांब आज सगळीकडे लोकप्रिय होत आहे. केवळ मुंबईतच आजच्या घडीला, 30 ते 40 मल्लखांब क्लब आहेत, काही वर्षांपूर्वी ही संख्या केवळ पाच ते सहा इतकी होती, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राशी मल्लखांबचे अतूट नाते आहे. बाळभट्ट दादा देवधर, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे क्रीडा आणि व्यायाम प्रशिक्षक होते, त्यांनीच अठराव्या शतकात पेशव्यांच्या सैन्यासाठी प्रशिक्षण पद्धती म्हणून या क्रीडाप्रकाराचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे, महाराष्ट्रातून आतापर्यंत काही उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू उदयास आले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

या शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित स्वदेशी खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्यता मिळत आहे. 2019 मध्ये, पहिली मल्लखांब जागतिक अजिंक्यपद स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 17 देशांनी भाग घेतला होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केवळ आशियाई देशांचेच नव्हे तर युरोपीय देशांचेही खेळाडू सहभागी झाले होते, यातून ह्या खेळाचा जगभर प्रसार होत असल्याचेच दिसत आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »