महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर २०२६ला देश कर्जात बुडेल – ॲड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर 2026ला देश कर्जात बुडेल अशी घणाघाती टीका ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागा आणण्याचा निर्धार केला आहे. पण भाजपचे 400 आणायचे की नाही जनता ठरवणार असे म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केले की योग्य ठिकाणी मतदान करा लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला मतदान करू नका असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

पुढे मराठा आरक्षणा विषयी बोलतांना ते म्हणाले आरक्षण नाही,तर निराशा दिली म्हणून हे फसवणूक करणारे सरकार आहे असा टोलाही यावेळी त्यांनी सरकारला लगावला, आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही,मात्र धर्माच्या राजकारणाला विरोध आहे. धर्माच्या नावाने जे राजकारण चालवले आहे त्याला आमचा विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर त्यांनी हेही सांगितले यावेळी सेक्युलर पक्षांचे सरकार येणार.

सरकारी यंत्रणाच्या धाड सत्रावर भाष्य करताना ते म्हणाले सरकारी यंत्रनांनी जे काम करतात त्यांना आमचा विरोध नाही ते त्यांच काम आहे, पण ते योग्य पद्धतीने व खऱ्या पणाने राबविले पाहिजे. या विषयावर सरकारला धारेवर धरत त्यांनी इतर राज्यात किती कारवाया आणि गुजरात मध्ये किती कारवाया यादी द्या असा सवाल सुद्धा केला. चोर माणसं भाजप पक्षात घेतो आणि स्वच्छ करतो हीच मोदी गॅरंटी आहे का ? असा सवाल ही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नवी मुंबई नेरूळ येथे आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत विविध पक्ष संघटनांच्या शेकडो नेत्यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या वेळी सत्ता परिवर्तन महासभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे नेते मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षातून जगदीश घरत, नासिर रशिद शेख, पवन निखाडे, राहुल चव्हाण, अविनाश अडागळे, अमन मंगवना, दिनेश साळवे, जितेंद्र काबंळे, विनय मोरे, अबु बाखर नाखवा, अरबाज शेख, गणपत शेलार, सुशील मोरे आणि किरण ठाकरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. तसेच, मुस्लिम समाजातील नेते मोहम्मद फैजल शेख, शेख शहाबुद्दीन सिद्दीकी, नसिर खान, खालीद भाई यांनी वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला. खाटीक समाजाचे नेते शमसुद्दीन मोमीन, सर्वर खान तसेच, आदिवासी समाजाचे नेते ॲड. सुनील टोटावाड, संपत वळवी, लक्ष्मण मुठे, अमोल भालेकर या सर्व आदिवासी नेत्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. याबरोबर मारवाडी समाज, मातंग समाजातील नेत्यांनीही पक्ष प्रवेश केला.

देशात सध्या हुकूमशाहीची राजवट आली आहे. ती बदलायची असेल तर सत्ता परिवर्तन करणे आवश्यक आहे. देशातील तरुण दिशाहीन झाला आहे. त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे. तसेच, तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ते मार्गदर्शन सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरच करु शकतात असा विश्वास ॲड. सुनील टोटावाड यांनी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »