महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सोबत सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर

नेशन न्यूज मराठी टीम.

हिंगोली/प्रतिनिधी – राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा नांदेड जिल्ह्यातून निघून हिंगोली जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशी आली त्यावेळेस जनतेचा प्रचंड मोठा जनसागर या यात्रेत सामील झाला होता. आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन शिवसेनेचा भारत जोडो यात्रेला पूर्णपणे पाठिंबा आहे हे उपस्थितांना दर्शविले.राहुल गांधी यांची काल सकाळी सहा वाजल्यापासून पदयात्रा हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाली होती. या पदयात्रेत ज्या जिल्ह्यातून राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जाऊ शकत नाही. त्या त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी पदयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला प्रतिसाद देण्याकरता हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोंढे येत असताना दिसत होते. लातूर हा मराठवाड्यातील एक भाग असल्याने लातूरमधूनही हजारो कार्यकर्ते या पदयात्रेसाठी येताना दिसत होते. नांदेड वरून हिंगोली येथे
प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भारत यात्रेचे भव्य प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते. बहुतांशी लोकांनीं आपल्या पारंपारिक कला सादर करून राहुल गांधीचे स्वागत केले .कला पथके हि आपली पारंपारिक कला सादर करत होते.

कलापथकांना विचारल्यानंतर तुम्हाला कोणी बोलवले व का असे विचारले, तरीही त्यांनी सांगितले आम्ही स्वत: होऊन या भारत जोडोचे स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत. राहुल गांधी यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची तळमळ आम्हाला दिसते आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य संगीत लोककला सादर करणारे दिसत होते. जनतेचा जो अफाट जनसागर लोटला होता हा जनसागर कोणत्त्यांयाही आमिषाला बळी पडून आला नव्हता. तर तो आपल्या देशाच्या प्रेमासाठी येथे आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये एकच भावना होती की जो आम्हाला तारू शकतो असा हा आमचा नेता पायी येतोय, त्याच्या हाकेला साद देणे , त्याला प्रतिसाद देण्याची सर्वत्र भावना दिसत होती.

हिंगोलीच्या प्रवेशद्वारापासूनच महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील शिवसेनेचे युवा नेते माननीय आदित्य ठाकरे हे हिंगोली पासून सहभागी झाले आणि या दोघांची गळाभेट झाली. राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांची गळाभेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आणि आता आपल्या देशातील तरुण जागा झाला आहे यातून दिसून येत होते.

लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फ मार्गावरती प्रचंड गर्दिचे लोंढे दिसत होते. खेड्यापाड्यातून आलेले असंख्य लोक दिसत होती. आणि ह्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे हे देखील जाणवले. कल्याण मधील किशोर खराटे हे या यात्रेत सामील झाले आहे त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सागितले देशा मध्ये मोठ्या संख्येने असणारा जनतेचा पाठींबा एखाद्या तरुण नेत्याला मिळणे मी प्रथमच बघितला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जनता हि कोणत्याही आमिषाला बळी ना पडता स्वताच्या इच्छेने सामील होने हि मोठी बाब आहे. त्याच बरोबर या भारत जोडो यात्रेत स्वखुशीने सर्वच वयोगटातील लोक सहभागी झाले आहे हे विशेष आहे .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »