महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील आणि आशा वर्कर्स यांचा सन्मान

भिवंडी/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार रविवारी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी भिवंडी तालुक्यातील  पडघ्या जवळील  बी. बी. पाटील न्यु इंग्लिश स्कुल  कुरुंद येथे  करण्यात आला आहे.  यावेळी शहापूर तालुक्यातील जय महाराष्ट्र भजनी मंडळ आवरे यांनी गाण्यातून प्रबोधन केले. तर सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल समाजकल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील, कवी ,साहित्यिक  अन्वर मिर्जा, चित्रकार सचिन पोतदार, आशा वर्कर मनिषा पाटील,  कीर्तनकार सुरेश घरत, कायदेविषयक सल्लागार  अँड. विजय दिवाणे अशा विविध क्षेत्रातील नागरीकांना सन्मानित करण्यात आले.तसेच कोरोना काळात आपला जीव मुठीत घेवून  कोरोना आजाराची  जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. म्हणून भिवंडी तालुक्यातील  नंदा मोरे, राजू कोबाड, सुनिता पाटील, शबाना  मोमीन, सावधान पाटील,  भावना भोईर, रुपाली  रमाणे, भक्ती राऊत,शोभा मोहंडूळे,,चित्रा फापे, रईसा शेख,  ललिता रामोशी, सारिका झुंजारराव , या ”आशा वर्कर्स  यांचा सत्कार  करण्यात आला. तर कोरोना काळात कोरोना बाधित मृत्यू पावलेले  पत्रकार रतन तेजे, प्रकाश निल,दिनकर गायकवाड,  यांच्या  कुटूंबियांना  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्य कमिटी व  ठाणे जिह्या कमिटी यांच्या वतीने  आर्थिक मदतीचा हात देण्यात आला . तर ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध  मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष  भगवान चंदे यांनी  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कडे सादर करण्यात आले. 

नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी, ठाणे, चिंचोटी तसेच  भिवंडी कल्याण  या चारही महामार्गावर सद्या टोलनाके सुरू आहेत. मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या रस्त्यावरचा टोल नाका सद्या बंद आहे. भिवंडी वाडा महामार्गावर तर अक्षरशः खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्तावरचा टोलनाका सद्या बंद आहे.  मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टोलनाका सुरू होणार असल्याचे समजले आहे. रस्त्याची दुरुस्ती न करता हा  टोलनाका सुरू केला तर सर्वांत आधी मीच हा टोलनाका पेटवून टाकेल. असे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. पत्रकार संघाच्या  कार्यक्रमा निमित्ताने अनेक नागरिकांना प्रेरणा मिळावी. आणि आपण अधिक काम चागले करावे असे यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील यांनी बोलतांना सांगितले.  तर पत्रकार  संघाच्या विविध  मागण्या केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न करेल.असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने अनेक ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला आहे. तर सामाजिक बांधिलकी जपून आम्ही प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतो. व सातत्याने नवीन उपक्रम हाती घेत असतो. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी बोलताना सांगितले.  

अनामिका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बी. बी पाटील,  प्राचार्य अनामिका विशे, आणि सहकारी  शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी बी. बी. पाटील स्कुलचे आभार व्यक्त केले.  

 यावेळी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,  एस. पी. ग्रुपचे सदस्य सोन्या पाटील, महिला बाळ कल्याण सभापती  श्रेया गायकर, जिल्हा परिषद सदस्य, कैलास जाधव, दयानंद पाटील, भिवंडी पंचायत समिती सभापती गुरुनाथ जाधव,पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत  गायकर, भिवंडी पंचायत समिती  सभापती  रविकांत पाटील, माजी सभापती  अशोक शेरेकर, बी. बी. पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे,तर  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष भगवान चंदे, जिल्हा  उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, जिल्हा सचिव नरेश पाटील,सचिव जनार्दन मोगरे,  कार्यध्यक्ष संतोष गायकर,भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे,भिवंडी शहर मनपा तालुका अध्यक्ष  संजय भोईर, कार्याध्यक्ष सुराजपाल यादव, सचिव मोनिष गायकवाड , तालुका उपाध्यक्ष  दीपक हिरे, सचिव मिलिंद जाधव,  कल्याण तालुका अध्यक्ष  जैतु मुठोलकर ,उपाध्यक्ष राजेश जाधव ,मुरबाड तालुका अध्यक्ष  सतिश घरत,उपाध्यक्ष शंकर करडे, सचिव दिलीप पवार, शहापूर तालुका अध्यक्ष सुनिल घरत, सचिव प्रकाश अंदाडे,  भिवंडी सदस्य नितीन पंडीत, अरविंद जैसवाल, फकरे आलन खान, संदिप गुप्ता, सुनिल देवरे, अनिल पाटील, आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके तर आभार पत्रकार  मेघनाथ विशे, पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »