महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी यशोगाथा

पोल्ट्री व्यवसायाच्या जोरावर घातली ‘मानद’ डॉक्टरेट पदवीला गवसणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. माणसाने कितीही प्रगती केली तरी शेती शिवाय अन्नधान्यासाठी त्याला पर्याय नाही. अनेक शेतकरी शेती करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु शेतीत अनेक प्रयोग करूनसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जातो. नैसर्गिक आपत्तीने ही शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. राज्यातले कित्येक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. पण काही शेतकरी पारंपारिक शेतीला आधुनकतेची कास धरत आर्थिक किमया साधत आहे.

शेतीतून योग्य उत्पन्न निघत नसल्याने,एका शेतकाऱ्याने वेगळा मार्ग निवडला. शेतीची जोड देऊन व्यवसायाच्या जोरावर तो आज लखपति झाला आहेत. नाशिक जिल्ह्यातील, भोयेगाव गावचे सुपुत्र उत्तम भागोजी ठोंबरे यांनी शेतीला पारंपारिक फाटा देत व शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. भागोजी ठोंबरे आणि त्यांचे कुटुंब 1990 पासून ते आत्तापर्यंत पोल्ट्रीचा यशस्वी व्यवसाय करत आहे. भागोजी यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये आज दोन लाख पक्षी आहेत. कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ठोंबरे कुटुंबीयांनी या यशाला गवसणी घातली आहे.

पोल्ट्री व्यवसाय मध्ये उत्तम प्रकारचे काम करीत असल्याने भागोजी ठोंबरे यांना जर्मन हेस्सल आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून ‘मानद’ डॉक्टरेट या पदवीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘मानद’ डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल चांदवड तालुक्यातील ग्रामस्थांनी भागोजी ठोंबरे यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Related Posts
Translate »