नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. माणसाने कितीही प्रगती केली तरी शेती शिवाय अन्नधान्यासाठी त्याला पर्याय नाही. अनेक शेतकरी शेती करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु शेतीत अनेक प्रयोग करूनसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जातो. नैसर्गिक आपत्तीने ही शेतकरी मेटाकुटीला आलेला दिसून येत आहे. राज्यातले कित्येक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. पण काही शेतकरी पारंपारिक शेतीला आधुनकतेची कास धरत आर्थिक किमया साधत आहे.
शेतीतून योग्य उत्पन्न निघत नसल्याने,एका शेतकाऱ्याने वेगळा मार्ग निवडला. शेतीची जोड देऊन व्यवसायाच्या जोरावर तो आज लखपति झाला आहेत. नाशिक जिल्ह्यातील, भोयेगाव गावचे सुपुत्र उत्तम भागोजी ठोंबरे यांनी शेतीला पारंपारिक फाटा देत व शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. भागोजी ठोंबरे आणि त्यांचे कुटुंब 1990 पासून ते आत्तापर्यंत पोल्ट्रीचा यशस्वी व्यवसाय करत आहे. भागोजी यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये आज दोन लाख पक्षी आहेत. कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ठोंबरे कुटुंबीयांनी या यशाला गवसणी घातली आहे.
पोल्ट्री व्यवसाय मध्ये उत्तम प्रकारचे काम करीत असल्याने भागोजी ठोंबरे यांना जर्मन हेस्सल आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून ‘मानद’ डॉक्टरेट या पदवीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘मानद’ डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल चांदवड तालुक्यातील ग्रामस्थांनी भागोजी ठोंबरे यांचे हार्दिक अभिनंदन केले.