नेशन न्यूज मराठी टिम.
जळगाव/प्रतिनिधी – जालना येथे लाठी चार्ज ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. जी घटना घडली तिचा निषेध व्यक्त करतो असेही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
लाठी चार्ज हा गृह मंत्रालयाच्या आदेशावरून होतो, तसा जालना येथेही लहान मुले, महिला, वृध्द, तरुण अशा सर्वांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. लाठी चार्ज ची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. दबावतंत्राचा माध्यमातून जे रक्त तुम्ही जालना येथे सांडले आहे, त्याचे एकच उत्तर असू शकते,आणि ते म्हणजे राजीनामा त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.