महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी .

ठाणे – कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, अश्या लोकांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा आणि शहरी भागात वार्डनुसार अन्नधान्याचे वाटप केले. ठाणे विभागात विठ्ठलवाडी, उल्हासनगर टिटवाळा,अंबरनाथ, कल्याण,आंबिवली , डोंबिवली या सारख्या अनेक भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
राज्यात लॉकडाऊन चालू झाल्यानंतर अनेकांचे काम बंद झाल्याने लोकांची उपासमार होऊ लागली. यावर उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गरीब, गरजू लोकांना मदत करा. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मदतीला सुरुवात केली. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागात मदत करण्यास सुरवात झाली. त्यात अन्नधान्यांचे किट, मास्क,
पाण्याच्या बाटल्या तसेच तयार केलेले जेवण इत्यादीचा समावेश होता. शिवाय मागेल त्याला ही मदत देण्यात येत होती. ठाणे जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या लोकांनी फोन करून मदत मागितली होती. अश्या लोकांना घरपोच मदत करण्यात आली. त्यापैकी टिटवाळा येथील इंदिरानगर भागातून मदतीचा फोन आला होता, त्यानुसार वंचितच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे, वंचितचे कार्यकर्ते संतोष गायकवाड व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हूंबरे यांनी टिटवाळा येथे जाऊन अनेक कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच विठ्ठलवाडी येथील श्रीराम कॉलनी, चिंचपाडा येथे सम्यक चे कार्यकर्ते गोपाळ गव्हाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप यांनी माया कांबळे यांना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात हजारो लोकांना सर्व प्रकारची मदत दिली असून अद्यापही ते काम चालू असल्याचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे यांनी सांगितले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर या सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विना बुंदिले, सुरेंद्र ठोके, ज्ञानदेव सुरवाडे, व्ही.डी. सपकाळे, उत्तम गवळी, प्रवीण गोसावी , रघुनाथ जाधव,सविता निकम,तायडे सर ,मेघराज येवले आणि विश्वविकास गायकवाड यांनी मदतीसाठी हातभार लावला. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Related Posts
Translate »