महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजरूम

कल्याणात आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा, रुग्णवाहिकेच्या अभावी महिलेचा मृत्यू

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याणात आज रुग्णवाहिकेच्या अभावी एका महिलेचा मृत्यू झाला. पुनः एकदा कल्याण डोंबिवलीतील आरोग्य सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे दोन लेकर अनाथ झाली आहेत. त्याच बरोबर हा मृत्यू फक्त एका महिलेचा नसून येथील आरोग्य व्यवस्थेचा झाल्याचा  दिसून येत आहे.कल्याण डोंबिवली शहरात आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचे चित्र दिसत आहे. तुटपुंजा आरोग्य सेवेमुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग तरी कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीची आरोग्य व्यवस्था स्मार्ट कधी होणार? की गरीब गरजू नागरिकांचे असंख्य बळी जातच राहणार.कल्याण डोंबिवली क्षेत्रात स्मार्ट सिटीचे मोठ मोठे प्रकल्प सुरू आहे. पण जर या सिटीत नागरिकच जीवंत नसतील तर मग ये प्रकल्प कुणासाठी? 

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार ३५ वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या  रुख्मिनीबाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला रुग्णांच्या नातेवाईक यांना अँब्युलन्स मिळण्यासाठी पाच तास लागले त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी पेक्षा लाजिरवाणी घटना घडली आहे. 

मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने पाच तास रुग्णालयात वाट पाहावी लागली या दरम्यान सविता यांचा मृत्यू झाला. आम्हाला वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर हा प्रसंग टाळता आला असता सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे, त्याच बरोबर जबाबदार असलेल्या रुग्णालयातील संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर नेहमी प्रमाणे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतांना आरोग्यासह नागरिक केंद्रीत कारभाराला प्रथम प्राधान्य राहील असा विश्वास येथील नागरिकांना दिला होता. त्यामुळे ते या प्रकरणात दोषींवर काय कारवाई करतात त्याच बरोबर आरोग्य सेवेत काय सुधारणा करणार याकडे येथील सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »