नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – नागपूर नंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 जागा विजयी झाल्या, यावेळी आमदार रवी राणा व भाजपच्या पॅनलचा यशोमती ठाकूर गटाने दारुण पराभव केला यावेळी विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः रस्त्यावर येत मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा केला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत यांचा पक्ष जो आहे तो शेतकऱ्यांचा नसून व्यापाऱ्यांचा आहे.असा टोला यावेळी यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला.
आमचं रक्षण हे हनुमान रायांनी केलं.हनुमान चालीसाचा गैरवापर करणाऱ्या राणा दाम्पत्याला शेतकऱ्यांनी धडा शिकवला.अस म्हणत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडलं, राणा दाम्पत्याने चांदीचे नाणे वाटले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे.अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.