महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

रिक्षा चालकांच्या आर्थिक मदतीची साईट होते हॅग,मदत नक्की कधी मिळणार : संतप्त रिक्षा चालकांचा सवाल

कल्याण/प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया तब्बल एक महिन्यानंतर सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याकरीता तयार करण्यात आलेली सरकारची साईट सारखी हँग होत आहे. त्यामुळे मदत खात्यात जमा होण्यासाठी रिक्षा चालकांना मनस्तापच सहन करावा लागतो.

राज्यात १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजी बंद असली तरी रोटी बंद होणार नाही. रिक्षा चालकांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा केली होती.  १५ एप्रिलच्या आधी सरकारने केलेल्या घोषणोनुसार पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा होण्याची सरकारी प्रक्रिया सुरुच झाली नाही. त्यासाठी ऑनलाईन साईट तयार करण्याकरीता एक महिना वाया गेला. आत्ता साईट तयार झाल्यावर कालपासून रिक्षा चालकांनी मदतीसाठी कागदपत्रंसह नोंदणी सुरु केली आहे. काल पासून ही साईट हँग होत आहे. आज सकाळी दोन तास साईट हँग होती. तांत्रिक कारणामुळे ही साईट हँग होते. त्याचा मनस्ताप रिक्षा चालकांना सहन करावा लागत आहे.

राज्यभरातून रिक्षा चालक एकाच वेळी ऑनलाईन कागदपत्रे सादर करीत असल्याने ही साईट हँग होते. मात्र साईट हॅँग होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कल्याणचे पदाधिकारी यांनी केली आहे. राज्यभरात १५०० रुपये मदतीचे रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या जवळपास ८ लाख १२ हजार आहे. त्यापैकी कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रतील रिक्षा चालक लाभाथ्र्याची संख्या ६० हजार आहे. आत्तार्पयत केवळ ७० रिक्षा चालकांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे सरकारची हि मदत मिळणार तरी कधी असा संतप्त सवाल रिक्षाचालक करीत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »