महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र मुख्य बातम्या

अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी

अलिबाग प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17 मे रोजी तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथील स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत तातडीने पाहणी केली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी खानाव, वावे, मल्यान, कुरुळ या गावांना दिलेल्या भेटीत खानाव, उसर, वेलवली गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या झालेल्या नुकसानीची, घरांच्या झालेल्या नुकसानीची तसेच कुरुळ परिसरात महावितरणकडून वीजेचे नवीन पोल बसविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे, त्याबाबतची पाहणी केली.

पालकमंत्री कु. तटकरे यांनी ग्रामीण विकास पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वेंगुर्ले यांना खानाव- ऊसर येथे पाण्याची नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »