महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

सरकारने राजीनामा द्यावा, जनता सरकारला माफ करणार नाही – नाना पटोले

नेशन न्यूज मराठी टिम.

नागपुर/प्रतिनिधी– मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि त्यानार या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला विरोधी पक्षांनी सरकारला या प्रकरणावरून  चांगलेच धारेवर धरले आहे.यावरून कॉग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. कॉग्रेस प्रदेशध्यक्ष यांनी सरकारवर करमरारीत शब्दात टीका केली आहे  ते म्हणाले की गृहमंत्री यांच्या आदेशाने झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो, सुलतानी सरकार आहे, स्वतःसाठी जगणार सरकार आहे, हे लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. त्यावेळी सुप्रीम कोर्टान फटकारल, उपोषण मंडपावर लाठीचार्ज होणं, हे दुर्दैवी आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रात झाल आहे.असेही ते म्हणाले 

राहुल गांधी यांची जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले.लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला, स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही.महाराष्ट्राची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. असेही ते म्हणाले 

यात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली, बदमाश वृत्तीचे लोक सत्तेत बसले आहेत, यांना बाहेर काढण्याचा संकल्प घेईल, हे सरकारं स्वतः भ्रष्टाचार करून परिवार वाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहेत. इंडिआ आघाडीची बैठक असल्यानं प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. 24 तासात आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. असे बोलत त्यानी फडणवीस यांच्यावर सुद्धा टिका केली.

उलट्या चोराच्या बोंबा आहेत, फडणवीस सांगत होते, आम्ही बिल माफ करू, आता दीड वर्ष लोटून काहीच केले नाही.हे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाही, भाजप सत्तेत बसून राजकारण करत आहे.कॉंग्रेस आगीत तेल टाकण्याची काम काँग्रेस करत नाही, तर भाजपचे हे काम आहे, तेल टाकणारे लोक सत्तेत बसले आहे.असा आरोप यावेळी विरोधकावर त्यांनी केला.

सरकार ने त्या  ठिकाणी लाठीचार्ज केला त्या ठिकाणी  शरद पवार जात आहेत, यात निर्दोष लोकांवर लाठीचार्ज झाला, बसेस जाळल्या जात आहेत, सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच पाप जनता भोगत आहे.असाही आरोप त्यांनी केला.

 केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर बोलताना नाना पाटोलेनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला,नियमित अधिवेशन आताच संपलं. पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही. आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न पडले आहे, दुष्काळ परिस्थिती असताना केंद्रातील सरकार यावर बोलायला तयार नाही, जुमलेबाज सरकार आहे. 

भारत भारत आहे, हा शब्द कुठला आहे, मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात, मोहन भागवत हिंदुस्थान म्हणत आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली

कॉग्रेसच्या पदयात्रे बद्दल बोलताना ते म्हणाले आष्टी शहिद येथून पदयात्रेची सुरवात करत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केल, यात्रेला जनतेचा प्रतिसाद आहे.मी 22 ते 24 किलोमीटर रोज चालणार आहे. 3 ते 12 दिवस ही यात्रा आहे. नवरात्री नंतर दुसरी यात्रा होईल.

एक देश एक निवडणूक यावर बोलताना नानांनी सरकार चांगलेच धारेवर धरले मला असं वाटत की, समर्थन करण्यास हरकत नाही. पण निष्पक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, जातीपातीवर मतदान व्हावे, बॅलेटवर निवडणुका व्हाव्या, लोकशाहीचा खून हे सरकार करत आहे, गळा कापण्याचे पाप हे करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »