महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या शिक्षण

सरकार राजकारणात व्यस्त,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेचे कष्ट

नेशन न्यूज मराठी टीम.

रायगड/प्रतिनिधी – मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसले. मोठ मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातच राज्याच्या राजकारणात सरकार राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेते स्वताच्या स्वार्थासाठी बेडूक उद्या मारताना दिसून येत आहे. संपूर्ण राज्याचे वातावरण गडूळ झाल्याचे दिसून येत आहे. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कुणाला कोणते मंत्रिपद याच्याही चर्चा सुरु आहे . त्यातच नवीन पक्ष आता सध्या सत्तेत सहभाही झाला आहे. त्यामुळे नवीनच वळण राजकारणाला आले आहे. त्याच माध्यमातून रायगडचा पालकमंत्री यावरून बरेच वादंग, रुसवे, फुगवे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पण खरच पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा पाल्य म्हणून साभाळ करतात का हा एक संशोधनाचा विषय आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील तलवळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेतून पायपीट करावी लागत आहे. बाजूला असलेल्या दोन आदिवासी वाडीमधून विद्यार्थी शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून येत असतात. डोंगराळ खडतर वाटेतून तब्बल अर्ध्या तास चालत शिक्षण घेतानाचे चित्र दिसून आले आहे.सरकार फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करून दुर्बल आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या बाता मारताना दिसुन येत आहे.

पावसाळ्यात गवत आणि पाणीत्याच बरोबर खडतर वाटेतून चालणे मुश्कील होत असल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये दांडी मारतात, त्यातच साप व इतर कीटकांचा पावसात संचार जास्तअसल्यामुळे पालक धोका पत्करत नाही व आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे.
तलवळी ही जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा असून देखील रस्त्या अभावी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्याचसोबत मुख्य रस्ता हा दूर असल्यामुळे आदिवासी बांधवांना मुलांना रोज शाळेमध्ये सोडणं शक्य होत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

हि आदिवासी शाळेतील एक परिस्थिती झाली राज्यभर अशा अनेक शाळा आहेत तिथे गोर गरीब विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी धड रस्ता नाही शालेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. छताला गळती लागली आहे. जंगल डोंगरातून वाट काढत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जात शिक्षण घ्यावे लागत आहे.सरकारने या गरीब विद्यार्थ्यांच्या मुलभूत हक्काच्या प्रश्ना कडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोण सत्तेत येत आणि कोण नाही पालकमंत्री कोण आहे आणि कोण नाही या सर्वांनी काय फरक पडतो.पण धड रस्ता नाही म्हणून शिक्षण घेता येत नाही यामुळे या गरीब आदिवासी मुलांच्या भविष्यात खूप फरक पडतो . हा फरक सरकारने लक्षात घेतला पाहिजे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »