महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

सरकारने कागदी घोडे न नाचवता सरसकट मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा – रेखाताई ठाकूर

मुंबई/प्रतिनिधी – राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता सरसकट मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन धोरण कुचकामी असून दरवर्षी काहीही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत.संभाव्य पूर परिस्थितीचे आकलन करण्यास सरकार आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे.पुरात नागरिकाची घरे, शेती, व्यावसायिक साधने, गुरे ढोरे, वाहून गेले किंवा पाण्याखाली गेले आहेत.मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. एकाच पावसाने राज्यातील सुमार दर्जाचे रस्ते, पूल ह्या पूरामुळे पुर्णतः वाहून गेले.त्याचा फटका संपूर्ण राज्यातील नागरिकांना बसत आहे.
सरकारने तातडीने पूरग्रस्तांना प्रत्येकी १० लाख जीवितहानी साठी आणि पाच लाख आर्थिक मदत त्यांचे बँक खात्यात सरसकट जमा करावी.शेतकरी आणि व्यापारी ह्यांना देखील पुर्नवसन पॅकेजची गरज असून शेतकऱ्यांना वीज बिल माफी त्यांच्या पाल्याना शैक्षणिक शुल्क माफी, शेतकऱ्यांना पाच लाख प्रत्येकी मंजूर करावे.

मागील वर्षी आलेल्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली होती, अनेक बाधित पूरग्रस्त मदती पासून वंचित आहेत.मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून जनतेला मदत करावी, नुसते कागदी घोडे नाचवू नये,बचावकार्य आणि पुर्नवसन कार्य जलद गतीने करावे तसेच विरोधी पक्ष भाजपने देखील राजकारण न करता केंद्र सरकार कडून अर्थ सहाय्य मंजूर करून आणावे, असे आवाहन देखील वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केले आहे.पुरानंतर संभाव्य रोगराई विरोधात आरोग्य विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील वंचितने केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »