महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण

नेशन न्यूज मराठी टीम.

शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम केलं जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरूवात आजपासून श्रीरामपूर येथून करण्यात आली. रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे‌. सामाजिक न्याय विभागाच्या अहमदनगर सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने जन शिक्षण संस्थानच्या सहकार्याने ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीयांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आज,२० जूलै रोजी श्रीरामपूर येथे उद्घाटन करण्यात आले. श्रीरामपूर येथील तृतीयपंथीय समाज आश्रम येथे २३ जूलै पर्यंत ही प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न होणार आहे.

या कार्यशाळा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नुरजहा शेख होत्या. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे दिग्विजय जामदार, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, तलाठी राजेश घोरपडे, जन शिक्षण संस्थानाचे संचालक बाळासाहेब पवार, डॉ. एम. डी. गोसावी, श्रीमती पिंकी शेख, दिशा शेख उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी http://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या तृतीयपंथीयांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते. अशा ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीय व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी विविध शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत‌. तेव्हा शासकीय योजना, उपक्रम व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी ‘ट्रान्सजेंडर’ नॅशनल पोर्टलवर नोंदणी करावी. असे आवाहन ही देवढे यांनी केले. प्रशिक्षण कुशलतेने पूर्ण करून भविष्यात त्याचा आत्मनिर्भर बनण्यासाठी उपयोग करून घ्यावा. यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य समाज कल्याण विभागाकडून केले जाईल. अशा शब्दांत देवढे यांनी उपस्थित तृतीयपंथीयांना आश्वासत केले. नायब तहसीलदार श्री.वाघचौरे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तृतीयपंथीयांना माहिती दिली. यावेळी स्वच्छता पंधारवाडाच्या निमित्ताने उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »