नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जालना/प्रतिनिधी – जालना जिल्ह्याचे तापमान 43 अंशावरती गेल्यामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यामुळे उष्माघाताचा वाईट परिणाम हा नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. उष्माघातामुळे उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होणे तसेच चक्करही येण्याचा धोका असतो. त्यामुळे कमीत कमी घराबाहेर पडल्यास उन्हापासून संरक्षण होऊ शकते. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच दुपारच्या वेळेला घराबाहेर पडा असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे चोवीस तास वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सुध्दा संचारबंदी सदृष्य परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कामगार किंवा मजूर असतील त्यांना दुपारच्या वेळेला थोडा अवधी किंवा ब्रेक देण्यात यावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत.