महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुख्य बातम्या राजकीय

महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकच्या जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात नव्या राजकीय पक्षाची स्थापना

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नाशिकच्या जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात निर्भय महाराष्ट्र पार्टी नावाचं राजकीय संघटन उभे राहिले आहे. यामध्ये महाराष्ट्रातले मुद्दे महाराष्ट्रातला स्वाभिमान आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू असून, यावर काम होणे अत्यावश्यक आहे. परंतु आज पर्यंतचे राजकीय स्थिती बघता ,महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या मागे ठेवण्यात या राजकीय पार्ट्यांचा मोठा सहभाग आपल्यास दिसून येतो. आजची राजकीय स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एक भक्कम प्रादेशिक पक्ष पाहिजे होता की ,जो जनतेची गोष्ट करेल ,जो जनतेच्या प्रश्नांसाठी दिल्लीकरांशी भांडेल पण तसे होताना दिसले नाही. उलट दिल्लीकरांच्या पुढे शेपूट हलवण्यात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यात, राजकीय पुढार्‍यांनी समाधान मानले.

आज शेतकरी, कष्टकरी,कामगार,बेरोजगार ह्यांचे अनेक प्रश्न आहेतच, त्यासोबत सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचारच भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे खूप मोठा अनाचार ,अनागोंदी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पण याची ढग अजून बऱ्याच लोकांना बसलेली नाही .पण बरेचसे लोक या धागेत होरपळ सुद्धा आहेत .या आम्ही जवळून पाहिले आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण जनसामान्यांची प्रश्न सोडवत गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक रस्त्यावर, ओरडतो आहोत भांडत आहोत लढत आहोत प्रसंगी आम्ही रडतही आहोत. पण आज कुठेतरी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा होऊ पाहत आहे. महाराष्ट्रातले लोक जेव्हा महाराष्ट्रासाठी उतरतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा मावळ्यांचा महाराष्ट्र आहे हा स्वाभिमानी लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. पण तो महाराष्ट्र आज या निर्दयी राजकारण्यांपुढे हतबल झालेला दिसून येतोय म्हणून सबंध महाराष्ट्राची गरज म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी स्थापन करावीशी वाटली आणि या निर्भय महाराष्ट्र पार्टीतून आम्ही महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसापासून तर उच्चशिक्षित तरुणापर्यंत सर्वांना आम्ही खऱ्या अर्थाने निर्भय बनवणार आहोत आणि त्याला निर्भय बनण्यासाठी परिपूर्ण ताकद देऊन या पार्टीमार्फत आम्ही सहाय्य करणार आहोत आणि जनतेचे राज्य जनतेसाठी कसं उपयोगात आणता येईल याचे एक मॉडेल महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्र आजपर्यंतचा इतिहास पाहता नुसता देशालाच नाही तर जगाला मार्गदर्शक ठरलेला आहे पण आता पुन्हा एकदा आपल्या इतिहासाची आपल्यालाच विसर पडल्यामुळे, आपण पुन्हा एकदा सर्वजण कंबर कसून उभे राहायचे आहे आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी लढाईचे आहे.

सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचार,शिक्षण, आरोग्य, रस्ते,बेरोजगारी निर्मूलन या प्रमुख पाच मुद्यांवर तसेच या व्यतिरिक्त इतरही विभाग लवकरच पक्षातर्फे स्थापन करण्यात येणार आहेत. मंत्रालय, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालये यावर कार्यालयातील तक्रार निवारणााठी महिन्यातून एकदा निर्भय दिन राबवणार आहोत. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र भावे, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री तुषार निकम, महाराष्ट्र राज्य सचिव जगबिर सिंग, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्री नितीन रेवगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधून ही माहिती दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »