महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

जळालेल्या फळबागांची नुकसान भरपाई न मिळाल्यास आमरण उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा

 

जालना/प्रतिनिधी – सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जालन्यात (Jalna) पाण्याचं संकट पाहायला मिळतंय. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जालन्यातील अनेक गावांत पाण्याअभावी बहरलेल्या फळ बागांचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला माल जळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. असे असताना देखील नुकसान झालेल्या बागांचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी या जळालेल्या फळबागा घेऊन आज शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पुढील 7 दिवसात आम्हाला २ लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmers) केली आहे. प्रशासनाने ८ जून पर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे.

Related Posts
Translate »