महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर / प्रतिनिधी – काही महिन्यापूर्वी टोमॅटोला प्रति २० किलोला ४ ते ५ हजार रुपये भाव मिळत होता. याकाळात काही शेतकरी मालामाल झाले.यावेळी शेतकरी अतिशय आनंदी होता.माञ केंद्र सरकारने टोमॅटोचे आयात धोरण राबविल्याने हे दर हळूहळू कमी होउन आज तो प्रती २० किलो जाळीला ७०ते ६० रुपयावर येऊन ठेपले आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी १०००,१२००,१५०० रुपयेचे स्वप्न बघितले त्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र घोर निराशाच लागली आहे.आता सध्या प्रति किलो टोमॅटोला २ ते ३ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ भीमराज जाधव यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही स्वतःच्या १ एकर शेतात टोमॅटोची उत्तम प्रकारची लागवड केली.चांगला भाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी टॉमेटो बागही फुलवली.मात्र बाजारभाव पडल्याने त्यांना आता टॉमेटो फेकून देण्याची वेळ आली आहे.टोमॅटो शेतीसाठी लागणारे पाणी,औषध फवारणी,मजुरांवरील खर्च तसेच.टोमॅटो मार्केटला नेण्यासाठी येत असलेला खर्च हे सर्व सध्या मिळत असणाऱ्या टोमॅटो दरापेक्षा जास्त येतं असल्याने शेतकरी सोमनाथ जाधव हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना टोमॅटो शेती करणं अवघड व जिकरीचे बनलं आहे.सरकारने शेतकऱ्यांना निदान हमीभाव तरी द्यावा जेणेकरून शेतकरी जगेल.अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही असे मत बोलताना शेतकरी जाधव यांनी व्यक्त केले आहे.सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे मात्र शासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या कैफियतद्वारे आपली व्यथा मांडली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »