नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी १० कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण मुरबाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या भूसंपादनाला काही शेतकाऱ्यांचा विरोध आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष्य करण्यात आले आहे.
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचा सर्व्हे सुरू असताना कल्याण तालुक्यातील आंबिवली गावातील काही शेतकाऱ्यांनी याचा विरोध केला. शेतकऱ्यांचा गोंधळ घालत हा सर्वे बंद पाडला. तब्बला अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं.कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गात काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्याचबरोबर राहतं घर बाधित होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी या संदर्भात हरकती नोंदवल्या आहेत. मात्र या हरकतींवर कोणत्याही प्रकारची सुनावणी न करता जमिनीचा अधिकाऱ्यांकडून सर्व्हे सुरू करण्यात आला. तसेच भूसंपादनासाठी नोंदवलेल्या हरकती संदर्भात सुनावणी घेण्यात यावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्याचबरोबर उल्हास नदीच्या बाजूला सरकारी जमीन असताना आमची जमीन भूसंपादित करून आमचं आयुष्य, जीवन उद्ध्वस्त का करता? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकाऱ्यांनी घातलेल्या गोंधळानंतर भूमिका अधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकाऱ्यांच्या हरकती आहेत त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी कोणत्याही प्रकारचा सर्व्हे केला जाणार नाही, ज्यांच्या हरकती नाहीत त्यांच्या जमिनीचा भूसंपादनासाठी सर्वे केला जाईल अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.



