नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
वर्धा/प्रतिनिधी – वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर निवेदन सादर करणार असून एमएसपी बाबत शेतकरी विरोधी धोरण हटवून 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार व दिल्ली येथील सीमेवर अविरत सूरू असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला न्याय केव्हा देणार याबाबत स्पष्टतः द्यावी. अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
तसेच शेतकरी यांच्या पिकाला भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा देशभरातील शेतकरी आपल्या सरकारचा येत्या लोकसभा निवडणुकीत योग्य तो बंदोबस्त करतील, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे.