मुंबई/प्रतिनिधी – लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली. मतदार राजानेही यावेळी मतदानास उत्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नव मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याच बरोबर वेगवेगळ्या झालेल्या राजकीय घडामोडी नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदार केंद्रावर आलेले पाहायला मिळाले, पण पुनः काही मतदान केंद्रावर यंत्रणा या कुचकामी ठरल्याचा अनुभव मतदारांना आला आहे. मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार संघात मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आहे. पण ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावरून अभिनेते आदेश बांदेकर दोन तास रांगांमध्ये उभे असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. त्याच बरोबर इतर मतदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. व यंत्रणाच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहे. जर एवढी मोठी तयारी यंत्रणा या वर्ष वर्ष भर करतात . जनतेचे लाखों रुपये यावर खर्च होतात मग मशीन बंद पडण्याचे प्रकार घडतातच कसे? आणि आम्ही तयार आहोत अशा वल्गना करणे कितपत योग्य आहे.
निवडणूक आयोग कोट्यवधी रुपये खर्च करून मतदार जनजागृती करतो . आणि मतदार त्याला प्रतिसाद देत मतदान केंद्रावर येतात आणि मतदान करण्यासाठी यंत्रणांच्या कुचकामी पणामुळे अपयशी ठरत असतील तर याची जबाबदारी कुणाची? त्याच बरोबर ईव्हीएम मशीन दोन तास बंद असल्याने गेलेल्या वेळ मतदारांना वाढवून मिळणार आहे का? यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.