महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी मुंबई

मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रात ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा संताप

मुंबई/प्रतिनिधी – लोकसभेच्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली. मतदार राजानेही यावेळी मतदानास उत्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नव मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याच बरोबर वेगवेगळ्या झालेल्या राजकीय घडामोडी नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदार केंद्रावर आलेले पाहायला मिळाले, पण पुनः काही मतदान केंद्रावर यंत्रणा या कुचकामी ठरल्याचा अनुभव मतदारांना आला आहे. मुंबईत पवईतील हिरानंदानी मतदार संघात मतदार केंद्रात मागील दोन तासांपासून मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आहे. पण ईव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

यावरून अभिनेते आदेश बांदेकर दोन तास रांगांमध्ये उभे असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. त्याच बरोबर इतर मतदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. व यंत्रणाच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहे. जर एवढी मोठी तयारी यंत्रणा या वर्ष वर्ष भर करतात . जनतेचे लाखों रुपये यावर खर्च होतात मग मशीन बंद पडण्याचे प्रकार घडतातच कसे? आणि आम्ही तयार आहोत अशा वल्गना करणे कितपत योग्य आहे.

निवडणूक आयोग कोट्यवधी रुपये खर्च करून मतदार जनजागृती करतो . आणि मतदार त्याला प्रतिसाद देत मतदान केंद्रावर येतात आणि मतदान करण्यासाठी यंत्रणांच्या कुचकामी पणामुळे अपयशी ठरत असतील तर याची जबाबदारी कुणाची? त्याच बरोबर ईव्हीएम मशीन दोन तास बंद असल्याने गेलेल्या वेळ मतदारांना वाढवून मिळणार आहे का? यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

 

Related Posts
Translate »