नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
अमरावती/प्रतिनिधी – नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपयश आले असेल तरी, काँग्रेस लोककल्याणासाठी काम करत राहील. या देशात कोणत्याही व्यक्ती किंवा पार्टीच्या बाजूने हवा नाही. या देशात घटनात्मक लोकशाही हवी असेल तर सर्वानी काँग्रेस सोबत जोडने आवश्यक आहे.
पाच राज्याच्या झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे रुपयात सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं, गुजरात, महाराष्ट्रात त्यांचेच सरकार आहे. आता त्यांनी आपले आश्वासन पूर्ण करावं. महाराष्ट्रातही साडेचारशे रुपये सिलेंडर द्यावे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी दिली आहे.