महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची मोहीम राबवणार आहे. तसेच, तृतीय पंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्या नाव नोंदणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवली जात आहे त्यानुसार  कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.

केंद्र शासनाने व राज्य शासनाने तृतीय पंथीयांना समानतेचा हक्क दिला असला तरी  आजही समाजात तृतीय पंथी याची अहवेलना होताना दिसून येत आहे.तृतीय पंथीयांची जनगणनेत नोंद व्हावी व त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी शासना कडून तृतुय पंथीयांची मतदार नोदणी करण्यात येत आहे. कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते तृतीय पंथीयांनी मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद दिला १०० च्या वर यात नोदणी झाली आहे.

मतदार यादीत नाव येणे म्हणजे आम्हाला कुठेतरी समानतेची वागणूक मिळत आहे.तसेच समानतेच्या हक्कासाठी व अधिकारासाठी ते गरजेचे आहे असे मत किन्नर अस्मिता संस्थेच्या तम्मना केने यांनी व्यक्त केले,त्याच बरोबर जास्तीत जास्त तृतीय पंथीयांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहनही केले. ज्या तृतीय पंथीयांना आपले नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे त्यांनी किन्नर अस्मिता संस्थेची संपर्क करण्याचे सागितले आहे.

यापूर्वी आमच्या कडे एकही कायदेशीर ओळखपत्र किवा कागदपत्र नव्हते तृतीयपंथी समाज असा आहे कि त्याची आधीची ओळख तो मागे ठेऊन नवीन ओळख त्याला निर्माण करावी लागते. पण कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे ते खूप आवघड होऊन बसले होते. साधे मोबाईल सीम कार्ड घेण्यासाठी खूप त्रास व कसरत करावी लागत होती. पण आता सरकारने जी मतदार यादीत नाव नोंदणीची संधी दिले आहे त्यामुळे आम्हाला आमची एक ओळख मिळणार आहे. आम्हालाही मुख्य प्रवाहात घेतल्याची आता जाणीव होत आहे. अशी भावना किन्नर अस्मिताच्या नीता केने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.त्याच बरोबर निवणूक आयोगाचे खूप खूप धन्यवाद मानले.

निवडणूक मतदार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यानी मतदार नोंदणीला तृतीयपंथीयांचा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »