महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम

DESK MARATHI NEWS ONLINE.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने बरेच शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करतात. त्यामुळे शेतामध्ये कापसाचे पीक डोलताना दिसते. परंतु यंदा वीज पुरवठा (Power supply) नियमित होत नसल्याने लागवड केलेल्या कापसाला वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकाच्या वाढीवर याचा परिणाम होत असल्याची माहिती कापूस उत्पादक शेतकरी गिरीश माळी यांनी दिली आहे.

कमी क्षेत्रावर कापूस (Cotton) लागवड केल्यामुळे त्याला पाणी भरण्यासाठी ठिबकच्या नळ्या टाकाव्या लागतात. कारण विजेचा पुरवठा नियमित होत नसल्याने कमी क्षेत्रावर लागवड केलेल्या कापसाला पाणी भरता येत नाही. पाणी कापसाच्या पिकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी अनावश्यक खर्च करावा लागत आहे. जर पूर्ण वेळ वीज मिळाली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कापसाला पुरेसे पाणी देता येईल. ह्या कारणामुळे शेतकरी पूर्ण वेळ वीज मिळावी अशी मागणी शासनाकडे करत आहेत.

 

Related Posts
Translate »