नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात भाव ४० टक्क्याने वाढविण्यात आला आहे. ह्याचे परिणाम कांदा व्यापारी व शेतकरी ह्यांना प्रकर्षाने भोगावे लागणार आहेत. ह्याची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदे मालाचा भाव ठरवताना झाल्याची जाणवत आहे.
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले असून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये जवळपास सरासरी 2200 रुपये बाजारभाव मिळत असल्याने, या मिळणाऱ्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. तरी सरकारने 3 हजार ते 3500 हजार रुपये कांद्याला बाजार भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत.



