नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात पाऊस होत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आता उद्भवणार आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघा ३३ टक्के पाणीसाठा आहे तर पिण्यायोग्य पाणीसाठा 25 टक्के उपलब्ध आहे. हा पाणीसाठा फक्त ९० दिवस पुरेल एवढाच आहे.धरणात पाणीसाठा कमी असल्याने आजपासून तीन दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याच्या निर्णय नंदुरबार नगर पालिका प्रशासनाने घेतला आहे.
येणाऱ्या दिवसात पाऊस पडला तर धरणाची पाणी पातळी वाढणार आहे. परंतु पाऊस नाही पडला तर आणखी भीषण पाणीटंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार आहे.म्हणून पाणी जपून वापरा असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विनाकारण कोणी पाणी वाया घालत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिकाकडून देण्यात आलेले आहे.