महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी चर्चेची बातमी

टोमॅटो भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल

नेशन न्यूज मराठी टीम.

अहमदनगर / प्रतिनिधी – दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाले होते. मात्र आता याच टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे, अशी व्यथा माहुली – खंदरमाळ (ता.संगमनेर) येथील शैलेश गाडेकर या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍याने मांडली आहे.

खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील शैलेश गाडेकर यांनी टोमॅटोला चांगले बाजारभाव असल्याने जुलै महिन्यात जवळपास एक-एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली होती. त्यातच पाणी टंचाई असताना देखील त्यांनी टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेतली.

टोमॅटो सुरू होवून दहा ते बारा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र आता याच सोन्यासारख्या टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे गाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे. झालेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत होते. म्हणून या आशेवर टोमॅटो पीक घेतले. पण बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो पिकावर झालेला सर्व खर्च अंगलट येणार आहे अशी व्यथाही शैलेश गाडेकर या तरूण शेतकर्‍याने मांडली आहे.

सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहे. अशा कठीण परिस्थितही पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी आदी गावांमधील शेतकर्‍यांनी खासगी टॅंकरव्दारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. पण टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »