नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठातून समता शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून समता शांती पदयात्रा सुरू झाली व यात्रेचा समारोप भडकल गेट जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला.
या रॅलीमध्ये विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्राध्यापक, प्राचार्य व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समतेचा संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे.राज्यघटनेमध्ये सामाजिक मुल्य समाविष्ट केलेले आहे त्याचाही प्रचार झाला पाहिजे कारण तरुण नागरिक हे उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी या समता शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी सांगितले आहे.