महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

मच्छिमार,कुंभार,सुतार समाजाच्या मागण्यासंदर्भात चर्चा, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

मुंबई – समुद्रात मासेमारी करणाऱ्यांपेक्षा राज्यातील तलाव, धरण व नदीवर मासेमारी करणाऱ्या लोकांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे लिलाव पद्धत बंद करून मच्छिमार बांधवांना मासेमारीचे थेट ठेके देण्यात यावे, त्याचबरोबर कुंभार, सुतार, लोहार समाजाच्या लोकांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या दोन्ही मागण्या मान्य केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत या मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तलाव, धरण परिसर, नदी व इतर ठिकाणी मासेमारी करणारा मच्छीमार समाज सध्या आर्थिक संकटातून जात आहे. राज्यात बोगस सर्टिफिकेट तयार करून मच्छिमार सोसायट्या रजिस्ट्रेशन करण्यात आल्या व त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिलावात भाग घेऊन मच्छिमारी चे ठेके घेतले. परिणामी खरा मच्छीमार बांधव हा गरिबीमुळे लिलाव प्रक्रिये पासून दूर गेला. त्यामुळे ही लिलाव पद्धत बंद करण्यात यावी, तसेच मच्छीमारी सोसायट्यांवर अध्यक्ष, सचिव व खजिनदार हे याच समाजातील असावे, अशांनाच लिलाव न करता थेट टेंडर काढून मच्छीमारीचे ठेके देण्यात यावे, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून आम्ही सरकारी आदेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कुंभार सुतार,लोहार हा समाज घरगुती उद्योग करून आपले आयुष्य जगतोय. त्यांना बँकांकडून मदत मिळत नाही. अश्या घरगुती उद्योग करणाऱ्या लोकांची जिल्हाधिकारी मार्फत यादी तयार करण्यात यावी व त्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी चर्चेदरम्यान केली. अनुदानापोटी ५० कोटीच्या आत खर्च येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आली. या मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून याबाबत ते कधी आदेश काढतात याची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Related Posts
Translate »