महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

ईव्हीएम मशीन बदलल्याने वंचितचे धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नांदेड/प्रतिनिधी – देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 26 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी दीडशेच्या वर ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या, तर सायंकाळी पाच वाजता सत्तरहून अधिक ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ईव्हीएम मशीन बदलत असताना संबंधित कोणत्याही उमेदवाराला जिल्हा प्रशासनाच्या वतीने अथवा निवडणूक विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ही माहिती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधितांना कळविण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीन का बदलल्या? याचा जाब विचारण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच ते सहा ठिकाणीच ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या होत्या. उर्वरित कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या नाहीत. असे असताना 250 ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या ही माहिती आता जिल्हा निवडणूक विभागानेच जारी केली आहे. त्यामुळे सुरुवातीला बोटावर मोजण्या इतक्या ईव्हीएम मशीनबाबत तक्रार आल्याची माहिती प्रसिध्द करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने 250 मशीन बदलल्याचे लेखी निवेदन काढले आहे. त्यामुळे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्याने ईव्हीएम मशीन बदलाण्यामागे नेमका काय हेतू होता? हे जिल्हा निवडणूक विभागाने त्वरित जाहीर करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Posts
Translate »