महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

मेळघाटातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटनेचे धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती / प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील आदिवासी बांधव तसेच इतर रहिवासी नागरिक अजूनही आरोग्य, शिक्षण, पाणी,अशा विविध मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत. आजही मेळघाटात कुपोषणामुळे बालमृत्यू होत आहेत. परंतु तरीही शासन स्तरावर उपाय योजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे मेळघाटातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सामाजिक संघटना व स्थानिक रहिवासी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मेळघाटातील कुपोषणामुळे 1993 मध्ये 1 हजारांपेक्षा जास्त बालमृत्यू मेळघाटात झाले होते. तेव्हापासून अनेक राजकीय नेत्यांनी तसेच त्यांच्या पक्षांनी मेळघाटमध्ये भेटी देत कुपोषण मुक्तीसाठी अनेक आश्वासने दिली होती. परंतु अजूनही मेळघाट कुपोषण मुक्त झाला नाही. तसेच येथील शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे या बाबींसाठी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे सरपंचांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×