महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे महत्वाच्या बातम्या

फेरीवाल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – मुंबई, ठाणे यांसारख्या भागात अनेक फेरीवाले बसतात. फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. त्यावरच त्यांचे पोट अवलंबून असते. पण फेरीवाल्यांमुळे रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवायांचा काहीच परिणाम या फेरीवाल्यांवर होत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे फेरीवाले चर्चेत असतात. आता पुन्हा फेरीवाले चर्चेत आले आहेत. फेरीवाल्यांसोबत केडीएमसी उपायुक्तांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.

१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टॉल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला. भर रस्त्यात एका फेरीवाल्यास केडीएमसीच्या उपायुक्तांनी लाथाडल्याचा आरोप करत महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. तसेच कारवाई न झाल्यास मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा वळवणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.

फेरीवाल्यांसोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त करत उपायुक्तांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. मात्र अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या आंदोलनाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या आंदोलनाचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने वळवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल संघटनेने पालिका प्रशासनाला दिला आहे.

आपल्याकडे बेरोजगारी सारखी मोठी समस्या असल्यामुळे फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या अतिक्रमण करवायांमुळे बऱ्याचदा फेरीवाल्यांचे फार नुकसान होते. फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »