नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली / प्रतिनिधी – धनगर समाज आरक्षण प्रश्न सध्या विविध ठिकाणच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येत आहे. एसटी संवर्गात समावेश केला जावा हि या समाजाची मागणी आहे. हे समाजबांधव समाजातील वंचित घटक असूनही कुणी राजकीय पुढारी यांच्या हक्काच्या लढाईत पुढे येताना दिसत नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्यामुळे धनगर समाजबांधवानी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन उभे केल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धनगर समाजातील नेते शिवाजीराव कानबाराव खरात यांनी बाळासाहेब यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम यशवंत भवन अकोला येथे झाला.
श्री खरात हे 1985 ते 1997 मध्ये मराठवाडा सहकारी साखर कारखान्याचे मजूर संघटनेचे अध्यक्ष होते.1998 ते 2002 या दरम्यान ग्रामसेवक संघटना तालुका सचिव पदावर कार्यरत होते. 2003 ते 2016 ग्रामसेवक संघटना हिंगोली जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. 2017 ते 2021 ग्राम सेवक संघटना महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार होते आणि सध्या हिंगोली शहारा लगत असणाऱ्या ग्राम पंचायत कारवाडी येथे विद्यमान सरपंच आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा विभागीय सदस्य रविंद्र वाढे, हिंगोली जिल्हा महासचिव ज्योतीपाल रणवीर, माजी पंचायत समिती सभापती विनोद नाईक, जिल्ह्याचे नेते बबन मामा भुक्तर,युवा आघाडीचे भीमराव सुर्यतल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.